
Posts
Showing posts from October, 2022
दसऱ्याच्या निमित्त .....येथे रात्रभर जागून सजविण्यात येतो प्रभाग
- Get link
- X
- Other Apps

बदलापूर :- आपल्याकडे वर्षभर कितीही सण असले तरीही दसरा -दिवाळीचे महत्त्व काही खासच आहे. दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असे उगीच म्हटले जात नाही. या सणांवारी घर कितीही स्वच्छ असले तरीही साफ -सफाई ही केलीच जाते. विशेष म्हणजे फक्त घरातच नाही तर घराबाहेर देखील या सणांचा चांगलाच उत्साह जाणवतो. त्यामुळे एखाद्या दुकानात अथवा कोणाच्या घरी गेल्यास तिथली एखादी सजावट पाहून मनाला एकदम प्रसन्न वाटते. किंबहुना या सणांमधली जी मांगल्याची अनुभूती असते ती अधिक जाणवते. या उद्देशातून अनेक जण आपलं घर परिसर स्वच्छ करत असते परंतु प्रभाग विकासाचा ध्यास घेतलेल्या कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून गेल्या 13 वर्षापासून बेलवली भाग संपूर्णपणे स्वच्छ करून रांगोळी आणि फुलांच्या माळांची आरास करून सजवित असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सणाचे औचित्य साधून बेलवली भागात सजावट करण्यात आली आहे. रांगोळ्या, फुलांच्या माळा, तोरणे बांधून या सणाचे स्वागत करण्यात आले आहे. रात्रभर जागून पहाटेपर्यंत सजावट, रांगोळी काढण्याचे सु...