Posts

Showing posts from August, 2022

गणरायाचं आगमन होताच वरुण राजाचीही हजेरी

Image
 आज घरोघरी गणरायाचे वाजतगाजत आगमन होताच वरुण राजाने गणपती बाप्पाचे ( Imd Mumbai Issued Warning ) धुमधडाक्यात स्वागत केले आहे. सायंकाळी 7च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील तीन ते चार तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा मुंबई हवामान विभागाने संध्याळी सव्वा सहा वाजता दिला होता. त्यानुसार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईजवळ असलेल्या ठाणे शहर आणि कल्याण, बदलापूर, अंबरनाथ मध्ये संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला आहे.  हवामान विभागाचा इशारा मुंबई हवामान विभागाने आज संध्याकाळी सव्वा सहा वाजता जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विजांचा कडकटात आणि वेगवान वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. यासोबतच मुंबई आणि आसपास ठिकाणी  काही ठिकाणी पुढील तीन ते चार तासांत जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाने दिला आहे.

प्रभाकर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

Image
बदलापूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 80 टक्के समाजकारण आणि गरज पडल्यास 20 टक्के राजकारण करते. बदलापूर बेलवली येथे सुरु करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात सुध्दा जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले   यांनी केले. बदलापूर पश्चिम भाग येथील बेलवली गाव या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व मा. ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर पाटील जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.  शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठिकठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात येत आहे. नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी ही कार्यालय उघडण्यात येत आहेत. नागरीकांनी आपल्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आणाव्या आम्ही त्या सोडविण्याचा प्रयत्न करु असेही आशिष दामले यांनी सांगीतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर नेत्यांची सुध्दा जनतेशी नाळ जुळलेली आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विविध पक्षातील लोक प्रवेश करीत आहेत त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी विनय सरदार

Image
बदलापूर :- येथील बदलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी विनय सरदार यांची निवड करण्यात आली आहे. आपला व्यवसाय सांभाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सक्रिय सहभाग नोंदविणारे विनय सरदार हे कॅप्टन आशिष दामले यांचे खंदे समर्थक मानले जातात. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक उपक्रमामध्ये आणि आंदोलनामध्ये विनय सरदार यांनी आपला  सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी पक्ष श्रेष्ठींनी टाकली आहे तिला पात्र होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. येत्या कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत पक्षाला जास्तीत जास्त यश कसे मिळेल यासाठी जीवाचे रान करणार आहे. त्यासाठी आत्तापासून कामाला लागणार असल्याचे विनय सरदार यांनी यावेळी सांगितले.  युवकचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. विनय सरदार यांना पुढील वाटचालीस आशिष दामले यांनी  शुभेच्छा दिले असून विनय सरदार यांच्यावर सर्वसाधारण अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उद्या (दि. १७) बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्र गीताचे सामूहिकपणे गायन

Image
राज्यात उद्या (दि. १७) बुधवारी सकाळी ११ वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचे गायन होणार आहे. यासाठी नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या "स्वराज्य महोत्सवाचे” आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गत हे सामूहिक राष्ट्रगीतगायन राबवण्यात आले आहे. राज्यात या उपक्रमाची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी दिली. राज्य शासनाने सामूहिक राष्ट्रगीत गायना या बाबत शासनाकडून सविस्तर निर्णय जारी करण्यात आला आहे. तसेच सांस्कृतीक कार्य मंत्रालयाच्यावतीने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. या सामूहिक उपक्रमात राज्यातील सर्व अबाल वृद्धांनी सहभागी व्हावे आणि नवा विक्रम नोंदवावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. हा उपक्रम प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

Ryan International School, Ambarnath celebrated the 75th Independence Day

Image
Ambernath :- As the whole nation is celebrating the 75th Independence Day – Azadi ka Amrit Mahotsav. Ryan International School, Ambarnath also celebrated the 75th Independence Day of India on 15th August, 2022. The national flag was hoisted in the School for three days that is 13th, 14th and 15th of August, 2022 in order to pay respect to the nation. On 15th August the Independence Day celebration started at 8:00.a.m. All the students and the staff gathered in the school premises for the celebration. The Guests for the event were Mr. Abhya Bhartiya: Petty Officer Indian Navy (Engineering Mechanics), Mr. Om Prakash Pandey: Hony flying officer (Retd) (Indian Air force), Mrs. Darshana Damle: proprietor, social worker and Mr. Kamble: police inspector.  The programme started with the Lord's Prayer followed by the Bible reading and the Special Prayer. Then the Chief guests all together hoisted the National Flag and the National Anthem and the Flag Song were sung by everyone w...

विनायक मेटे यांचे अपघाती निधन

Image
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 52 वर्षाचे होते. एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. मुंबईच्या दिशेने येताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला अपघात झाला. माडप बोगद्यात ही दुर्घटना घडली. सकाळी 5 वाजता हा अपघात झाला. अपघातात मेटे यांना हात-पाय आणि डोक्याला मार लागला होता. अपघातानंतर जवळपास तासभर मदत मिळाली नाही, खूप वेळ फोन करूनही पोलिस वेळेवर पोहोचले नाहीत, अशी माहिती मेटेंच्या सहका-यांनी दिली.

बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तिरंगा ध्वजाचे वितरण, जास्तीत जास्त नागरिकांनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

Image
बदलापूर :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात,देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या इतिहासाचे अभियानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘हर घर तिरंगा’ (Tricolour every house) हे अभियान राबविण्यात येत आहे. हर घर तिरंगा अभियान अंतर्गत देशातील प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या घरावर तिरंगा ध्वज लावला पाहिजे, याकरिता बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तिरंगा ध्वजाचे वितरण हे करण्यात येत आहे. तिरंगा ध्वजाचे मुफ्त वितरण सुरू आहे आहे. पक्षातर्फे  शहरात ८००० तिरंगा ध्वज वितरित करण्यात येणार आहेत.  आपल्या भारत देशातील प्रत्येक कुटुंबाने या Har Ghar Tiranga Campaign अंतर्गत सहभागी व्हायचे आहे. असे आवाहन  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन  आशिष दामले यांनी केले आहे.तसेच बदलापूरवासियांनी हा तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक फडकवावा...

शिंदे सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; डॉ. बालाजी किणीकर यांना संधी मिळणार ?

Image
अंबरनाथ :- शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळ स्तराची लगबग सुरू झाली असून मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळेल याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे अशावेळी अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.  महाराष्ट्रात सत्ताबदल करणारे एकनाथ शिंदे यांचे मंत्रिमंडळ  मंत्रिमंडळ विस्तार  लवकरच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी संभव्य मंत्र्यांची यादी समोर आली असून, यामध्ये भाजपचे आठ आणि शिंदे गटाचे सात मंत्री पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले जात आहे.  भाजप गोटातील संभाव्य मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, रवि चव्हाण, बबनराव लोणीकार, नितेश राणे यांचा नावाची चर्चा आहे. तर, या विस्तारामध्ये शिंदे गटातील सर्व माजी मंत्री शपथ घेणार असून यात दाद भूसे, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराजे देसाई, संदीपान भुमरे, डॉ बालाजी किणीकर, अब्दुल सत्तार, बच्चू कडू किंवा रवि राणा आदींच्या नावाची चर्चा आहे.